Marathi Poem on Lockdown because of Corona

काही म्हणा
पण इतकं मात्र खरं की
जगण्यातली मजाच सगळी हरवली

येणं नाही जाणं नाही
समोरासमोर बोलणं नाही
कट्ट्यावरच्या गप्पा नाही
मी तुला तु मला मन भरून
वाटी भरलं देणं नाही
लांब कुठं जाणं नाही
मोकळ्या हवेत फिरणं नाही
शनिवार नाही रविवार नाही
आज वार कोणता कळत नाही
पिक्चर नाही नाटक नाही
बाहेर कोणी जात नाही
घराचा झालाय कोंडवाडा
रस्त्याचा झालाय उकिरडा
बोलून बोलून तेच ते
‘ कंटाळा आलाय ‘ हेच ते
त्याला आता पर्याय नाही
घरात कोणाला करमत नाही
बाहेरची भीती सरत नाही
गाणी नको बातम्या नको
टी.व्ही. सारखा बघणे नाही
पेपर कोणी वाचत नाही
खरं काय नी खोटं काय
काही सुद्धा कळत नाही
पत्ते नाही भिशी नाही
बर्थडे नाही लग्न नाही
नवीन कपड्यात शिरणं नाही
नवीन काही घेणं नाही
पार्टी नाही सेलीब्रेशन नाही
खायला थोबाड उघडं नाही
शाळा नाही कॉलेज नाही
परिक्षेत काही राम नाही
खरा खुरा निकाल नाही
पेढे वाटण्यात मजा नाही
ब्युटी नाही पार्लर नाही
फडकं लावलेला चेहरा
खरा कोणाचा कळत नाही
उचापती नाही भांडणं नाही
तुझं माझं ही शर्यत नाही
कसलं काय नी कसलं काय
प्रेमप्रकरणाला वाव नाही
छे असलं जगण्यात अर्थ नाही
गुन्हा नाही जामीन नाही
अंधार कोठडी टळत नाही
राजकारणाशिवाय बात नाही
नेत्यांना त्याशिवाय करमत नाही
दोन महिने चार महिने सहा महिने
नऊ महिन्यात सुद्धा निकाल नाही …

काही म्हणा
पण इतकं मात्र खरं की
जगण्यातली मजाच सगळी हरवली … !

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *