Tulsi Vivah Puja Vidhi In Marathi

Tulsi Vivah Puja Vidhi In Marathi
Tulsi Vivah Puja Vidhi In Marathi

तुळशी विवाह साहित्य

पूजेचे साहित्य

  • भगवान श्रीविष्णूचे चित्र किंवा शाळीग्राम दगड
  • तुळशीचे रोप
  • दोन चौरंग
  • धूप
  • दिवा
  • अक्षता
  • हळद
  • पिवळे कपडे
  • लाल चुनरी
  • लाल साडी
  • मेकअपचे साहित्य
  • मधाच्या वस्तू
  • फुले
  • हार
  • ऊस
  • हंगामी फळे इ.
  • गाईचे तूप
  • कापसाची वात
  • कुंकू
  • मिठाई इ.

पूजेचे मंत्र

  • महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी,
  • आधि व्याधि हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते.

पूजेचे विधी

  1. शुभ मुहूर्तावर स्वच्छ चौरंगावर पिवळे कापड आणि दुसऱ्या चौरंगावर लाल कापड घालावे. यानंतर तुळस लाल कापड असलेल्या चौरंगावर ठेवा.
  2. नंतर पिवळ्या कापडाच्या चौरंगावर भगवान विष्णू किंवा शालिग्राम स्थापित करा. त्यानंतर दोन्ही चौरंगावर उसाच्या साहाय्याने मंडप तयार करा.
  3. चौरंगांजवळ कलश स्थापित करा. त्यात पाणी, सप्तधान्य वगैरे टाकून आंब्याची पाने ठेवा. त्यानंतर तुळशीला कुंकू, अक्षता, फुले, फळे, मिठाई इत्यादी अर्पण करा. या दरम्यान वरील मंत्राचा जप करत राहा.
  4. आता तुळशीला मेकअपच्या वस्तू, मधाच्या वस्तू, लाल साडी अर्पण करा. तुळशीला लाल चुनरी अर्पण करा. त्यानंतर तुपाचा दिवा लावावा.
  5. आता भगवान विष्णू किंवा शालिग्रामला चंदन, अक्षता, फुले, कपडे, फळे, मिठाई इत्यादी अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावून अर्पण करा.
  6. यानंतर शालिग्रामला उचलून तुळशीची 7 वेळा प्रदक्षिणा करा. त्यानंतर दोन्हीची आरती पद्धतशीरपणे करावी.
  7. पूजेच्या शेवटी, क्षमा-याचनेसाठी प्रार्थना करा आणि कौटुंबिक सुख आणि समृद्धीची इच्छा करा. त्यानंतर प्रसादाचे वाटप करावे.

तुळशी विवाहाचे महत्त्व

तुळशी विवाहामुळे कुटुंबात सुख-समृद्धी वाढते. विशेषत: ज्या लोकांना मुलगी नाही, त्यांना तुळशी विवाहाचे आयोजन करून कन्यादान करण्याचे पुण्य मिळू शकते. धार्मिक मान्यतेनुसार कन्यादान हे सर्वात मोठे दान मानले जाते.

तुळशी विवाहाची कथा

तुळशी विवाहाची कथा ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितली आहे. एकदा, भगवान विष्णूचा पुत्र प्रद्युम्न, दैत्य राजा शंभरमुखाचा मुलगा चामुंडासुराने कैद केला होता. प्रद्युम्नाला मुक्त करण्यासाठी, त्याची पत्नी रुक्मिणीने तुळशी वृक्षाचा आश्रय घेतला. तुळशी वृक्षाने रुक्मिणीला आश्रय दिला आणि प्रद्युम्नला मुक्त करण्यासाठी मदत केली. या प्रकरणानंतर, तुळशी वृक्षाला लक्ष्मीची अवतार मानले गेले आणि तिचा विष्णूशी विवाह केला गेला.

तुळशी विवाहाचे काही उपाय

  • तुळशी विवाह केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी वाढते.
  • तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते.
  • तुळशी विवाह केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
  • तुळशी विवाह केल्याने रोग-व्याधी दूर होतात.

तुळशी विवाह हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी आणि आरोग्य येते.

====================================

दिवाळी झाली आणि आता आपल्याला तुळशी विवाहाची ओढ लागली आहे कारण आपल्या हिंदू धर्मात विवाह झाल्याशिवाय विवाहसोहळे साजरे केले जात नाहीत. म्हणजेच तुळशीचा विवाह एकदा संपन्न झाला कि लग्नाच्या तारखा निगतात. आपल्याकडे घरोघरी तुळस असते आणि तिचा विवाहसोहळा प्रेत्येक घरी साजरा केला जातो आजच्या लेखात आपण तुळशीच्या विवाहाचा शुभ मुहूर्त त्याची योग्य वेळ व पूजा विधी आपण पाहणार आहोत.

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात जी कार्तिकी एकादशी येते तिला आपण देवउठी एकादशी देखील म्हणतो त्या एकादशीला तुळशीचा विवाह लावला जातो. हा एक अध्यात्मिक उत्सव आहे. हिंदुमान्यतेनुसार ह्या दिवशी तुळशीचा विवाह श्री हरी विष्णूनसोबत लावला जातो कारण विष्णुदेव ह्यावेळी ४ महिन्यातून उठतात.

श्री हरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीला एक नाव वृदां देखील आहे. ज्या वेळी नारायण निद्रेतून जागे होतात त्या वेळी सर्वात आधी ते हरी वल्लभा तुळशीचे म्हणणे ऐकतात. म्हणून तुळशीविवाहाला देवजागरनाचा पवित्र मुहूर्त मानले जाते.

ह्या वर्षी तुळशी विवाह १५ नोव्हेंबर पासून सुरवात होत आहे. तुळशी विवाह लावल्याने कन्यादानाचे फळ प्राप्त होते. आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार गोदान व कन्यादान सर्वात मोठे दान मानले जाते म्हणून तुळशी विवाह करणे अत्यंत आवश्यक आहे.

तुळशी विवाह शालिग्राम ठेवून संपूर्ण विधिपूर्वक केले जाते परंतु काही व्यक्ती घरी ब्राह्मणाला बोलावून किंवा मंदिरात जाऊन तुळशी विवाह करू शकत नाही म्हणून आपण आजच्या लेखात घराच्या घरी ब्राह्मण न बोलावता कश्या प्रकारे तुळशीचे लग्न करू शकतो हे पाहणार आहोत.

सर्वात आधी कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे ते पाहुयात. एक तांब्या, नारळ, आंब्याची पाने, पाणी, लाल रंगाची ओढणी, पिवळे कापड, गंगेचे पाणी, पांढरे तीळ, हळद, कुंकू, कापूर, धूप, दीप, ऊस, वेलची, सुपारी, श्रुंगाराच्या वस्तू, पाच फळे, आवळा, एखाद्या प्रकारची मिठाई, खीरपुरी, पंचामृत, मसाला पान, फुलांच्या माळा, तुळशीची कुंडी, शालिग्राम आणि दोन चौरंग हि सर्व सामग्री घेऊन आपण तुळशीच्या विवाहाची तयारी करावी.

त्यानंतर विवाह विधीची तयारी करावी, विवाह हा सायंकाळी गोरखमुहूर्तवर केला जातो त्यासाठी तुळशीच्या आसपासची जागा स्वच्छ करूंन सुंदर रांगोळी काढावी. त्यानंतर एका चौरंगावर तुळस असलेली कुंडी व दुसऱ्या चौरंगावर शालिग्रामची किंवा श्री विष्णूंची स्थापना करावी. वरती उसाचा मंडप टाकावा.

तुळशीच्या चौरंग उजव्या बाजूला ठेवावा, त्यानंतर श्री हरी विष्णूंच्या चौरंगावर अष्टदल कमळ बनवावे आणि त्यानंतर त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवून त्यावर स्वस्तिक काढावे. आंब्याच्या पानांना कुंकू लावून ती पाने कलशावर ठेवावीत.

त्यानंतर एक नारळ घेऊन ते लाल कपड्यात गुंडाळावे व कलशावर ठेवावे. त्यानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. कारण अग्नीला साक्षी मानूनच तुळशीचा विवाह संपन्न केला जातो. त्यानंतर गंगेच्या पाण्यात एक फुल बुडवून ते पाणी ओम श्री तुळसीए नमः अश्या मंत्राचा जप करत तुळशीवर शिंपडावे.

त्यानंतर त्याच फुलाने गंगेचे पाणी ओम नमो भागवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करत श्री हरी विष्णूनंवर शिंपडावे. त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू व हरी विष्णूंना चंदनाचा तिला लावावा. त्यानंतर दुधात हळद टाकून दोघांना लावावी. त्यानंतर विष्णूंना तुळशीच्या मंजिरा व्हाव्यात. तुळशीला लाल ओढणी टाकावी, व लाला रंगाच्या बांगड्या देखील अर्पण कराव्यात, तसेच सर्व सौभाग्याचा वस्तू अर्पण कराव्यात.

त्यानंतर हरी विष्णूंना स्नान घालून पिवळे वस्त्र अर्पण करावीत. पिवळे फुल वाहावे, त्यानंतर श्री हरी विष्णूंना व तुळशीला माळा अर्पण कराव्यात. त्यानंतर लाल वस्त्र घेऊन त्यांचे गठबंधन करावे, त्या कपड्यात एका बाजूला फुल, वेलची, सुपारी, व दक्षिणा ठेवावी. त्यानंतर घरातील पुरुषाने तुळस असलेली कुंडी उचलून शालिग्राम किंवा कृष्णाच्या मूर्तीला सात प्रदिक्षणा घालाव्यात सात प्रदिक्षणा झाल्यानंतर तुळशीला तिच्या ठिकाणी स्थानापन्न करावे. त्यानंतर शाळीग्राम ला धूपदीप अर्पण करून फळे खीरपुरी मिठाई ह्यांचा नैवद्य दाखवावा.

त्यानंतर तुळशीची व विष्णूंची आरती करावी. अश्या प्रकारे सध्या व सोप्या पद्धतीने तुळशी विवाह तुम्ही घराच्या घरी संपन्न करू शकता.

======================

According to the Hindu calendar, Tulsi Vivah is celebrated every year on the Ekadashi of Kartik Shukla Paksha. This year, Tulsi Vivah will take place on Saturday, November 5, 2022. On the day of Tulsi Vivah, the marriage of Tulsi and Lord Shaligram is performed. It is believed that the union of Tulsi and Shaligram brings the blessings of Goddess Lakshmi and Lord Vishnu, and their divine blessings are obtained.

To enhance marital bliss and resolve conflicts in married life, special rituals are observed on the day of Tulsi Vivah. Married women observe fasting and perform worship on this day. It is believed that by following certain practices on Tulsi Vivah, a harmonious and prosperous married life can be achieved. Acharya Gurmeet Singh from Delhi provides some remedies to be followed on the day of Tulsi Vivah for a happy married life.

Here are the remedies to be followed on the day of Tulsi Vivah:

  1. Offer Tulsi to the union of Tulsi and Shaligram:
    • During the worship, place Tulsi and Shaligram together to symbolize their marriage.
    • Offer red Chunri, sindoor, bindi, bangles, red clothing, alta, etc., during the puja.
    • After the puja, donate these items to a married woman. This ritual is believed to bring happiness to married life.
  2. Strengthen relationships with the mixture of Tulsi and water:
    • To resolve minor disputes between spouses, mix Tulsi leaves in water on the day of Tulsi Vivah.
    • Sprinkle this water throughout the house. This remedy helps dispel negative energy and resolves issues in marital relationships.
  3. Perform joint worship:
    • On the day of Tulsi Vivah, spouses should perform worship together.
    • Jointly reciting the Mangalashtak of Tulsi can be beneficial for increasing love and resolving issues in married life.
  4. Auspicious Timing (Abuja Muhurat):
    • Tulsi Vivah takes place on an auspicious day, but it is advised to avoid other marriages on this day due to the influence of Shukra (Venus).
    • After Tulsi Vivah, wait for four months before considering other auspicious marriage dates.

By following these remedies on the day of Tulsi Vivah, couples can strengthen their bond and overcome challenges in marital life.

तुळशीचे लग्न किती तारखेला आहे?
तुळशीच्या लग्नासाठी काय काय लागते?
तुळशीचे लग्न का करतात?
घरी तुळशीविवाह कसा साजरा करावा?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *